Posts

Showing posts from April, 2020

#तापमानवाढ #विकास

        एका संशोधनातून गंगेच्या पाण्याची गुणवत्ता ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. कारण कोरोनामुळे केंद्र सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू वगळता बाकीचे सर्व व्यवहार(कार्बन उत्सर्जन)करणारे पुर्णपणे ठप्प झाले आहेत.          पण इथे कोरोनाच्या संकटामुळे हे प्रदूषण कमी झाले आहे. त्यानंतर काय??  हे संकट गेल्यानंतर जैसे थी परिस्थिती होणार. तापमान वाढीसारख्या संकटाला आपण कसे सामोरे जाणार?? तापमान वाढीचे वातावरणावर होणारे परिणाम थांबविण्यासाठी २०२० पासुन कार्बनचे उत्सर्जन कमी करणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. सध्या तरी हे कोरोनामुळे साध्य होताना दिसत आहे. पण त्यानंतरचे काय?                     कारण तापमान वाढीचे संकट खुपच गंभीर असणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार दर वर्षी कार्बन उत्सर्जनात ७.६  टक्क्यांनी घट झाली तरच जागतिक तापमान वाट १.५ डिग्री सेल्सियसने कमी करता येईल. हे तेव्हाच साध्य होईल जेव्हा सर्व राष्ट्रे...
       काही लोक खूप विद्वान असतात, त्यांचा अफाट अभ्यास असतो, म्हणजेच ते पुस्तक पंडीत असतात. त्यांच्या मते लोकमतापेक्षा पुस्तकी ज्ञान श्रेष्ठ असते, त्यांनी जे वाचलेले असते त्याच्या आधारावर ते लोकांचे मोजमाप करत असतात.        आणि जर का लोक त्याच्या विपरीत वागले तर ते लोकांना मुर्ख ठरवून टाकतात, आणि याबाबतीत या पुस्तक पंडितांचा आत्मविश्वास अफाट असतो. पण ईथे एक गोष्ट आवर्जून नमूद कराविशी वाटते की, प्रत्येक ठिकाणी पुस्तकी ज्ञान उपयोगी येतेच असे नाही.         कारण माणूस हा विवेकशील प्राणी आहे, तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून परिस्थिती नुसार वागत असतो. त्यामुळे तो नेहमी एकसारखाच वागेल(पुस्तकी पंडितांच्या नजरेतून) अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणा ठरेल.          याचा अर्थ असा नाही होत की पुस्तकी ज्ञान गरजेचे नाही, पुस्तकी ज्ञान अत्यंत आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर समाजात वावरणे, लोकांशी संवाद साधने, वेगवेगळ्या प्रदेशांना भेटी देणे देखील तितकेच आवश्यक आहे. यातून समाज, संस्कृती, माणसे यांची ओळख होईल, त्याचबरोबर...

क्रोधात्‌ भवतिसंमोहा्त्‌ । संमोहात्‌ स्मृतिविभ्रम॥ स्मृतिभ्रंशात्‌ बुद्धिनाशो । बुद्धिनाशात्‌ प्रणश्यती ॥

    क्रोधात्‌ भवतिसंमोहा्त्‌ । संमोहात्‌ स्मृतिविभ्रम॥       स्मृतिभ्रंशात्‌ बुद्धिनाशो । बुद्धिनाशात्‌ प्रणश्यती ॥               क्रोध हा मानवामध्ये असणारा एक भाव आहे, जो सर्वांमध्ये असतो, पण काही जण संयमाने त्याला काबू करण्यात यशस्वी ठरतात, तर काहींना क्रोधच काबूमध्ये करतो, आणि मग त्याचे परिणाम काय होतात हे आपणा सर्वांना माहीतच आहे.        क्रोधाचे परिणाम वाईट ही असतात नि चांगलेही, पण बर्याचदा त्याचे परिणाम वाईटच होतात.. जसे की, जेव्हा आपणास क्रोध येतो, आपली शक्ति क्षीण व्हायला लागते, आपण मानसिक संतुलन गमावतो, वाणीवरील संयम गमावून बसतो, शारीरिक शक्ति असंतुलित होते, कधी कधी तर आपण क्रोधामुळे न लढताच आर्धी लढाई हरलेेलाे असतो.       याचा अर्थ असा होतो का की क्रोधाचा पुर्णपणे त्याग केला पाहिजे, तर मुळीच नाही. तर मी म्हणेल की, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी क्रोधीत झालेच पाहिजे, म्हणजेच क्रोधाला रचनात्मक स्वरूप देता आले पाहिजे.        जसे की, ज्यावेळी अफजलखान स्वराज्या...