Posts

Showing posts from May, 2020

आठवणींचा खजाना आणि मनाची भरारी...

लाँकडाऊनच्या या काळात आता नवीन असे काही करता येत नसल्याने, निसर्गात मनसोक्त फिरता येत नसल्याने, मित्र, आपले स्नेही यांना भेटता येत नसल्याने, तोचतोचपणा आल्याने मन देखील कधीकधी खुप बोअर होते. आणि मग स्वतःचेच समाधान करण्यासाठी स्मृतीच्या कपाटातील जुन्याच आठवणी, जुन्याच घटना, जुनीच स्नेहस्मरणे काढून त्यांच्याशी खेळत बसते. आणि जर येवढ्याने देखील तहान शमली नाही, तर मग काल्पनिक आशेचे पंख पसरून भविष्यात भरारी घेण्याचा प्रयत्न करते. बुडत्याला जसा काठीचा आधार असतो तसेच मन देखील काल्पनिक पंखाचा आधार घेऊन उंच-उंच भरीरी घेते आणि जसे पक्षी आकाशात उंच उंच भरारी घेतात, परंतु सांजवेळी पुन्हा आपल्या घरट्याकडे येतात, अगदी तसेच मन देखील मनसोक्त हुंदडल्यानंतर पुनश्च वर्तमानात येऊन स्थिरावते. हे असे चाललय सध्या जीवन. #मन_तो_मन_है_समझाने_से_थोडेही_मानता_है। -शिवाजी पाटील
Image
     🚩🚩छत्रपती संभाजी महाराज!! 🚩🚩 प्रखर बुद्धिमत्ता, अफाट विद्वत्ता, उत्तम लेखक, कवी, असामान्य कर्तृत्व, निडर नेतृत्त्व, कुशल प्रशासक, महापराक्रमी, पराकोटीचे सहास अंगी असलेले, सर्वगुणसंपन्न, बहुभाषिक, प्रतिभाशाली, साहित्यिक, स्वाभिमान, स्वराज्यभिमानी, छत्रपती संभाजी महाराज! महान शासक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. नेहमी स्वराज्य नजरेसमोर ठेवून, शिवाजी महाराजांच्या तत्वांपासून कधीही न ढळलेले, त्यांनी घालुन दिलेल्या तत्वांवरती चालत, शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचे रक्षण करणारे. कल्पना करा की ते जिवंत असताना, त्याची बोटं तोडण्यात आली, त्याचे डोळे गरम सळीने खेचले गेले, जिभे तोडली गेली, सतत 40 दिवस हा छळ चालू होता. तरीही त्यांनी हे छळ सहन केले आणि औरंगजेबा समोर झुकण्यास नकार दिला, यातूनच त्यांचे खरे सामर्थ्य आणि अविश्वसनीय मानसिक खंबीरपणा दिसून येतो. शेवट पर्यंत अपराजित राहीले, आणि मृत्यूला देखील पराभूत करून गेले. असे हे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज नेहमीच महान राजांपैकी एक म्हणून नेहमीच लक्षात ठेवले जातील. अशा या महान रा...